🕒 1 min read
मुंबई- रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला कायद्याने मिळावेत, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे करावी अशी सूचना भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी. विधानसभेत केली ती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केली.
राज्यातील अमली पदार्थ विरोधी कारवाई बाबत तारांकित प्रश्न आज विधानसभे चर्चेला आला असताना आमदार आशिष शेलार यांनी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. रांजणगाव येथे एका बंद कारखान्यात 132 कोटी रुपयांचे ड्रग्ज तयार होऊन त्यातील 112 किलो ड्रग्जची विक्री झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलिसांनी 22 आरोपींना अटक केली. पण सदर कंपनी सील करण्याचे अधिकार राज्याच्या कायद्याने राज्याला नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारला विनंती करुन अशा रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळावेत असे प्रयत्न राज्याने करावे, अशी सूचना आमदार. अँड आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान,पुढे बोलताना त्यांनी वांद्रे परिसरात अशा ड्रग्जचे अनेक अड्डे असून त्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील केली. याबाबत लवकरच एक ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- मोबाईल टॉवर्सकडे कोट्यवधी थकित, पालिका नेमणार खासगी एजन्सी
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
