Share

४० एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतलेले बेशरम सरकार मोर्च्याला सामोरे जाईल का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होत आहे. दरम्यान आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.

मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांकडून आज एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेतलेले हे बेशरम राज्य सरकार त्या मोर्चाला सामोरे जाण्याचे सौजन्य दाखवेल का? मुख्यमंत्री तर घर सोडणार नाहीत तर किमान परिवहनमंत्री तरी धाडस दाखवतील का? असा सवल करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान मुंबई मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पोलिसांनी अडवले आहे. मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. याचाच निषेध व्यक्त करत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!