Share

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोन सलामीवीर आहेतच, पण आता ऋतुराज गायकवाड आणि आयपीएलमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या वेंकटेश अय्यरलाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक आणि सलामीवीर असलेल्या इशान किशनलाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता संघात पाच सलामीवीर असणार आहेत.

मात्र यावेळी संघात विश्वचषकातील दिग्गज खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. यामध्ये कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांना संधी दिलेली नाही. तर यंदा युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली दिसते. तर आयपीएल गाजवणारा आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर हे संघात आहेत. विश्वचषकासाठी ज्याची निवड केली नसल्यामुळे वाद झाला होता तो फिरकीपटू युजवेंद्र चहल भारतीय संघात परतला आहे.

दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यातच आता संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा दिसून येत आहे. दरम्यान पुढच्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्यासाठी निवड समितीने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान न्यूझीलंड संघ टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौऱ्यावर येणार आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!