मुंबई : देशभरात हाथरस प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात देखील या प्ररकणावरून पडसाद उमटत असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना देखील योगी सरकारबाबत रोष व्यक्त करत आहेत. अशातच राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की व अडवणूक यावरून काँग्रेस अधिक आक्रमक झाली असून देशासह राज्यभरात निदर्शन देखील करण्यात आले.
मात्र, महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचारांचं काय? युपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकीसुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्याच्या समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या सहा महिन्यांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय ? असे प्रश्न भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.
हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिले पण इथे गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यांवर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पहाणार? असे देखील उपाध्ये म्हणाले.
केशव उपाध्ये म्हणतात –
‘हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाला अधिकार आहे. मात्र त्याच बरोबर हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत, त्या सरकारने गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे. महाराष्ट्रात कोरोनावर उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार , विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे. फेब्रुवारीमध्ये मध्ये 7 वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांना जिवंत जाळले गेले. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी या घटना घडल्या. यातील चौघींना जीवाला मुकावे लागले. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा त्यांच्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनाला समजलेले नाही, असे म्हणायचे कां ?’ असं केशव उपाध्ये आपल्या पत्रकातून म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- LGBT Cell ची स्थापना करत राष्ट्रवादीने घालून दिला इतर राजकीय पक्षांना आदर्श
- शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवणार? संजय राऊत म्हणतात…
- समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन
- #व्यक्तिविशेष – रिषभ पंत : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक झळकवणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज…
- प्रियंका गांधींसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची योगींकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

