🕒 1 min read
जालना: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतानाचे चिन्ह दिसत असतानाच आता निर्बंध वाढणार की कमी होणार असे प्रश्न निर्माण होत आहेत. यावरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“आता कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही रुग्णसंख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल. आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे”, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
तसेच कोरोनाची रुग्णसंख्या ४८ हजारांवरून १०-१५ हजारावर आली आहे. जिथे उच्चांक होता तिथेही रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आपण मार्चमध्ये एन्डेमिकपर्यंत जाऊ, असं मला वाटतं. काही ठिकाणी वाढ होतेय, तिथे उच्चांक गाठला जाईल. पण त्यानंतर रुग्णसंख्या पुन्हा कमी होईल असा अंदाज येत आहे. त्यामुळे शासनाचा कल निर्बंध वाढवण्याकडे नसून कमी करण्याकडे असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका
- ‘इको-बटालियन’च्या माध्यमातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास; भगतसिंग कोश्यारींचे प्रतिपादन!
- ‘तुम्ही तोंड सांभाळून बोला’; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना इशारा
- औरंगाबाद शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला; निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा-चंद्रकांत खैरे
- संसदेतही पवार-विखे वादाचे पडसाद; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खाल्ल्या मिठाला जागावं…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
