🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार फोडाफोडीवरून गेल्या काही दिवसांपासून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कधी राष्ट्रवादी तर कधी कॉंग्रेस,कधी भाजप तर कधी सेना विरोधी पक्षातील आमदार आपल्या पक्षात येतील असा दावा करत आहेत.आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमधील आमदार आपल्या पक्षात येतील असा दावा करायला सुरुवात केली आहे.
भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दुसऱ्या बाजूला भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत, शरद पवार याबद्दल निर्णय घेतील असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता मलिक आणि छगन भुजबळ यांनी हे नवं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपाचे काही नेते, आमदार फुटणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला
- मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त
- प्रेग्नेंट अनुष्का शर्मावर टीम इंडियाच्या पराभवाचं खापर! नेटकऱ्यांनी केले ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
