मुंबई : काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्रांचा प्रहार करत रोखठोक सवाल केला आहे.
यासंदर्भात सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विर मध्ये लिहिले आहे की,’ सोयाबीन चे भाव सातत्याने पडत आहेत याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने १२ लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिक सारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे’.
एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्याची कणव आहे असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे @Dev_Fadnavis जी मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2021
तसेच त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विट फडणवीसांना सवाल केला आहे की,’ एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्याची कणव आहे, असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?’
दरम्यान, केंद्र सरकार हे फक्त ३० ऑक्टो. पर्यंतचपरदेशातून सोयाबीन ढेपेची आयात करणार होते. परंतु देशात सोयाबीनचा तुटवडा जाणवत असून अजून खरिपाचे पीक आलेले नाही. त्यामुळे टंचाई वाढू नये यासाठी येणाऱ्या ३१ डिसें. पर्यंत सोयाबीन ढेपेची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘त्या’ रस्त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो पण पोटातलं पाणीसुद्धा हललं नाही – गडकरी
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- खामोश.. म्हणणाऱ्या ‘शत्रुघ्न’ यांना आज ही आठवतेय लग्नाची अनोखी कहानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

