🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली असल्याचा आरोप करत मी सादर केलेले पुरावे खोटे ठरले तर मी राजीनामा देईल आणि राजकारणातून संन्यास घेईल असे म्हटले आहे. यावरूनच आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सवाल केला आहे.
अभ्यास करणे हे आमचे काम नाही,आम्ही फक्त मार्कस देतो,असे मुख्यमंत्री स्वत:च कबूल करतअसताना नवाब मलिक मात्र जन्म-विवाह दाखल्याच्या अभ्यासासाठी मंत्रीपदपणाला लावतात. अभ्यास करायचा नाही हे मुख्यमंत्री सांगत असतानाही खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
अभ्यास करणे हे आमचे काम नाही,आम्ही फक्त मार्कस देतो,असे मुख्यमंत्री स्वत:च कबूल करतअसताना नवाब मलिक मात्र जन्म-विवाह दाखल्याच्या अभ्यासासाठी मंत्रीपदपणाला लावतात. अभ्यास करायचा नाही हे मुख्यमंत्री सांगत असतानाही खाते वाऱ्यावर सोडून केलेल्या ‘महत्वपूर्ण’ अभ्यासावर कारवाई होणार का?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 29, 2021
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंधन दरवाढीच्या मुद्यावरून केंद्रावर ताशेरे ओढले आहेत. मात्र यावेळी त्यांनी अभ्यास करणे आमचे काम नाही, तसे असते तर राजकारणात आलोच नसतो. पण मार्क देण्याचे काम आमच्याकडे आले आहे, असे मुख्यमंत्री यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांना उद्देशून म्हटले आहे. यावरूनच केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- मार्क झुकरबर्गची मोठी घोषणा; ‘फेसबुक’चे नाव बदलून ठेवले ‘हे’ नवे नाव
- 20 World Cup अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना रंगणार आज
- हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
