Share

भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा

Published On: 

🕒 1 min read

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला. मात्र आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचा अंतिम सामना व्हावा, अशी इच्छा पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान रविवारी झालेल्या लढतीत पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून मोठा विजय प्राप्त केला होता. तसेच त्या सामन्यातून दोन्ही संघांद्वारे मानवतेचा संदेश दिला गेल्याचे मतही सकलेन यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने भारताला पराभूत केले असले तरी भारताचा संघ मजबूत आहे. विश्वविजेतेपदाच्या दावेदारांपैकीही भारताला गणले जात आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान अंतिम सामना झाला तर उत्तमच होईल’ अशी इच्छा सकलेन मुश्ताक यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान आज सायंकाळी ७ वाजता पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे. तसेच वेस्ट इंडीज आणि बांगलादेश असा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना आज स्पर्धेत स्थान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा सामना चांगलाच रंगणार असल्याचे चिन्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!