लातूर : मराठवाड्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते निष्क्रिय आहेत. बैठकीत बोलण्याऐवजी गप्प बसतात. पश्चिम महाराष्ट्रातील नेते मराठवाड्यावर अन्याय करत नाहीत, तर आपलेच नेते करतात असा आरोप भाजप आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. उजनीच्या पाण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी ते का ठेवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला.
केंद्राच्या अर्थसंकल्पात मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याला किती निधी मिळाला, त्याचा फायदा किती होणार आहे, याची माहिती देण्यासाठी भाजपने लातूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात भाजप आमदार उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी आवाज उठवणार आहेत.
औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी उजनीच्या पाण्याचा विषय लावून धरणे आवश्यक होते. मात्र, कोणी बोलले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर केले होते. त्यामध्ये लातूरला सिना कोळेगावच्या माध्यमातून म्हणजे उजनीतूनच लातूरला पाणी आणण्याची योजना होती. ती या सरकारने रद्द केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट ज्यांच्या हातात आहे त्यांना उजनीचे पाणी विषय काढलेले आवडत नाहीत. विषय काढला तर आपल्याला मंत्रिमंडळातून काढले जाईल या भीतीने सत्ताधारी बोलत नसावेत,’ असा टोलाही निलंगेकर यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- नेटकऱ्यांनी झापल्यावर अमिताभ बच्चनची अक्कल आली ठिकाण्यावर, महाराजांचा केला होता एकेरी उल्लेख
- ‘ठाकरेंची सत्ता असलेला हा महाराष्ट्र आहे जिथे मटन पार्टीला परवानगी आहे मात्र शिवजयंतीला नाही’
- ‘उस्मानाबादसह औरंगाबादचे नामांतर करा, अन्यथा..’
- महिलांनो वेळीच सावध व्हा ! ‘डीपी’चं कौतुक करून जाळ्यात ओढणाऱ्या नराधमाला अटक
- महाविकास आघाडीने छत्रपतींच्या गादीचा अपमान केला; निलेश राणेंची सडकून टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

