🕒 1 min read
उस्मानाबाद : उस्मानाबाद आणि औरंगाबाद ही शहरे जुलमी राजवट व पारतंत्र्याची आठवण करून देणारी आहेत. त्यामुळे या शहरांची नावे बदलून धाराशिव व छत्रपती संभाजीनगर करावी अशी मागणी हिंदुराष्ट्र सेनेने केली आहे.
याबाबत वाशी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही नावे म्हणजे इतिहासात झालेल्या जुलमी राजवटीची व गुलामीची निशाणी सांभाळून ठेवत झालेल्या अमानुष अत्याचाराची जखम भळभळत ठेवल्यासारखे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेले असतानाही नावे कशासाठी, ती तत्काळ बदलावीत व उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे धर्मवीर छत्रपती संभाजीनगर हे नावे देऊन आपण स्वतंत्र देशात आहोत, याची प्रचिती द्यावी.
मागणीचा विचार न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर परीक्षित साळुंके, पवन नलवडे, प्रदीप पाटील, शिवराज जाधव, आशुतोष स्वामी, विकास क्षीरसागर यांच्यासह हिंदुराष्ट्र सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी असून त्यांच्या वतीने वाशी येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- रेशनचा काळाबाजार, दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल
- पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी
- महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी-पंकजा मुंडे
- …अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; भुजबळांचं सूचक विधान
- पोलीस ऍक्शन मोडमध्ये : …तर वनमंत्री संजय राठोड यांची पुणे पोलीस करणार चौकशी


