नवी दिल्ली : पेगाससच्या माध्यमातून राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची सध्या चर्चा सुरु आहे. या पाळत प्रकरणावरुन मोदी सरकावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी वारंवार प्रश्न विचारूनही केंद्र सरकारला अद्याप समाधानकारक खुलासा करता आलेला नाहीये. संसदेच्या अधिवेशनात सध्या या मुद्द्यावरून रान पेटलेले आहे.
पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक एकवटले असून पेगॅसस या स्पायवेअर वापराच्या प्रकरणावरून हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय.
विरोधकांचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा फक्त एकच प्रश्न आहे- भारत सरकारने पेगॅसस खरेदी केले का, हो की नाही; भारत सरकारने पेगॅससचा वापर देशाच्या नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी केला का, हो की नाही?
– खा. राहुल गांधी#BJPDebateSeDaroMat https://t.co/qLevwDx0nO— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 28, 2021
‘पेगॅसस स्पायवेअर हे दहशतवाद्यांविरोधात वापरायचं शस्त्र आहे. आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारायचे आहे की तुम्ही हे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. ‘विरोधकांचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा फक्त एकच प्रश्न आहे- भारत सरकारने पेगॅसस खरेदी केले का, हो की नाही; भारत सरकारने पेगॅससचा वापर देशाच्या नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी केला का, हो की नाही?’ असं देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दु:खद! अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदु नाटेकर यांचे निधन
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन


