औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खांदेपालट करत गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिलीप बनकर यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, पक्षाच्या या निर्णयामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेमध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. दाशरथे यांच्या कामावर नाराज असल्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यात आली की, अंतर्गत राजकारणामुळे यांच्याकडील जबाबदारी काढण्यात आली, हा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे त्यांच्या आक्रमक शैलीने ओळखले जातात. नुकतेच त्यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रके फेकून त्यांनी संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा चांगलाच उचचला होता. ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात आक्रमक होत, त्यांनी महावितरण आणि राज्य सरकार विरोधात दंड थोपटले होते. मात्र, अचानक त्यांच्याकडून दोन मतदार संघ काढून ते बनकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
जुना वाद नवा भिडू : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची औरंगाबादमधील धुरा सुमीत खांबेकर यांच्या खांद्यावर होती. त्यानंतर दाशरथे यांच्या प्रवेशामुळे मनसेला मोठा आणि आक्रमक नेता मिळाला होता. मात्र, त्यामुळे खांबेकर नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसात आक्रमक झालेल्या मनसेतील वाद मिटला असल्याचे वाटत होते. मात्र, त्याच वेळी बनकर यांच्या रुपाने हा वाद अद्याप संपला नसून पक्षांतर्गत कुरघोडी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कामाच्या वेळेत घरी झोपा काढणाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
- ‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल – देवेंद्र फडणवीस
- किरण बेदी यांना उपराज्यपाल पदावरून हटविले; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे
- विमानतळाचे विस्तारीकरणासाठी जमीनीवर टाकलेले आरक्षण रद्द करा
- ‘लग्नाला गर्दी होतेय आणि प्रशासन झोपा काढतंय’, केंद्रेकरांनी अधिकाऱ्यांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

