Share

‘जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का घालत नाही?’: तीरथ सिंह रावत

Published On: 

नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवेनिर्वाचीत मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांबाबत केलेल्या वक्त्याव्यामुळे त्यांच्यावर  देशभरातून संताप व्यक्त केला जाता आहे. महिला नेत्यांनी देखील यावरून निशाणा साधत टीका केली होती. मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा तीरथ सिंह रावत यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. रावत यांनी “कोरोना काळात जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही जास्त मुलं जन्माला का घालत नाही?” असा थेट प्रश्न उपस्थितांना केला आहे.

“कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात १० सदस्य आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात २० सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात २ सदस्य आहेत त्यांना केवळ १० किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं” असं रावत यांनी म्हटलं आहे.

नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. “मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण २० मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल” असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा केलेल्या या वादग्रस्त वक्त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, या सगळ्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!