Share

शेतकऱ्यांना मदत करा हे सांगायला भाजप कशाला हवा ? – वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावंच्या गावं पाण्यात गेल्याने अनेक संसार देखील उध्वस्त झाले आहेत.

अशात शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्तांना तातडीने आणि भरीव मदत करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत कळकळीची मागणी केली आहे. दरम्यान, मदतीबाबत आज राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.

मराठवाड्यातील ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून पाऊस ओसरला की १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. हे पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानाच्या अधारावर काही जिल्ह्यात की संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करायचा हे ठरवले जाणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यासोबतच, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करायला हवी, ही सर्वच पक्षांची मागणी असते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाही तसा आग्रह असतो. केवळ भाजप मागणी करतोय किंवा त्यांनीच केली पाहिजे असं काही नाही, असा टोला देखील वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!