नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेली जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यामुळे लोकांचा संताप सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने राज्यांना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक राज्य तसेच महानगरपालिकेन ग्लोबल टेंडर काढले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने परखड मत मांडत केंद्र सरकारला फटकारले आहे.
‘राज्य सरकार कोरोना लशींसाठी ग्लोबल टेंडर काढत आहेत. ही केंद्र सरकारची निती आहे का?, लशींसाठी आपण राज्यांमध्ये स्पर्धा लावताय का?’, असा प्रश्न करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले. तसेच केंद्र सरकार लसीकरणाबाबत राष्ट्रीय धोरण कागदपत्र सांदर करण्यातही अपयशी ठरल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली.
‘राज्य एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, हे म्हणणं चुकीचं ठरेल. काही राज्य जास्त पैसे मोजून लस घेतात. २०२१ च्या शेवटी संपूर्ण भारतातील नागरिकांचं लसीकरण करण्याची योजना आहे. यासाठी केंद्र सरकार फायजर आणि इतरांशी चर्चा करत आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास लसीकरण मोहिमेला वेग येईल’, असे मेहता यांनी सांगितले.सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिप्रश्न करत महाराष्ट्राचा दाखला दिला.
‘आम्हाला स्पष्ट दिसतंय, राज्य आणि महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढत आहेत. राज्य आणि महानगरपालिकेनं त्यांचं त्यांचं पाहून घेण्याची सरकारची निती आहे का?. मुंबई महानगरपालिकेचं बजेटची तुलना इतर राज्यातील शहरांशी करा. काही राज्यांपेक्षा महानगरपालिकेचं बजेट मोठं आहे. महानगरपालिकांना ग्लोबल टेंडरसाठी आपण परवागनगी देत आहात का?’, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने केंद्राला खडसावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिल्लीत गेल्यावर मोदींना ‘तेवढं’ नक्की सांगा’, अजितदादांचे आठवलेंना साकडे
- पुणेकरांना मोठा दिलासा; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून खाली ! लवकरच ‘हे’ नियम लागू होणार
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- …म्हणून फडणवीस शरद पवारांच्या भेटीला गेले असावेत; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाष्य
- ‘माझं गाव कोरोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

