नागपूर : भाजपाचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेले सर्व आरोप खोडून काढत त्यांनी सरकारच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही कुणाच्या बाजूने? ड्रग्स वापरणारे, पुरवणारे की त्याविरुद्ध कारवाई करणाऱ्यांच्या बाजूने? हे आधी ठरवा! असा खोचक सवाल फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकाला केला आहे.
पुढे फडणवीस म्हणाले, ईडी, सीबीआय का येते? ती आम्ही नाही आणली. ती येण्याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या सरकारचे नेतृत्व करत आहात ते भ्रष्ट सरकार आहे. खंडणी उकळणं हाच या सरकारचा अजेंडा आहे. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मात्र एक गोष्ट नक्की आहे. मोदी भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. भ्रष्टाचार केला असेल त्यांनी घाबरावं, ज्यांनी केला नाही त्यांनी घाबरू नये, असेही फडणवीस म्हणाले.
जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेटचा थेंब आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. जोपर्यंत भाजप जिवंत आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. काय वाटेले ते करू पण महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी बोलण्याची गरज नाही’, सोनिया गांधींचा स्वपक्षीय नेत्यांना टोला
- राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन आणि नफेखोरीमुळे वीज संकट; दानवेंचा घणाघात
- ‘…मग राणे, राज ठाकरे पक्ष सोडून का गेले?, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- लालफितशाही: सेवानिवृत्तीची रक्कम न मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’


