🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुनदरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मुंबईमध्ये दहा दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण करून भारतीय संघ २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची आज घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा ‘टाय’ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.
आयसीसीने या कसोटीसाठी राखीव दिवसाचाही घोषणा केली आहे. या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘राधे’ सिनेमातील भूमिकेमुळे नाराज असलेलल्या चाहत्यांना प्रविण तरडे यांनी दिले ‘हे ‘उत्तर
- ‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’
- विराट पाठोपाठ धोनीच्याही बिअर्ड लूकवर फॅन्स फिदा ; म्हणाले….
- दिलासादायक! तब्बल ३ महिन्यांनी जालन्यात रुग्णसंख्या शंभरच्या आत
- ‘दारूची चिंता करणारे पवार-ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेलं ग्रहणच आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
