मुंबई : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.
राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले असून तातडीची मदत म्हणून पुरबाधितांच्या खात्यात १० हजार रुपये देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे देखील मदतीचा हात मागितला असून तौक्ते चक्रीवादळानंतर गुजरातची पाहणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती झाल्यानंतर कुठे होते असा सवाल काँग्रेसने उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
‘अतिवृष्टी व महापुराने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आहे परंतु या नैसर्गिक आपत्तीवेळी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले नाही. अजूनही केंद्र सरकारची कुठलीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही. एनडीआरफची मदतही मिळालेली नाही. महाराष्ट्रावर आपत्ती कोसळली असताना पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहणीसुद्धा केली नाही हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री कुठे होते?,’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार? कॉंग्रेसचा सवाल
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- विद्यार्थ्यांचे ना लसीकरण, ना लोकल प्रवासास मुभा; मग सीईटी परीक्षा कशी घेणार ? : उच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

