मुंबई: त्रिपुरा येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळाले. अमरावती येथे मोठा हिंसाचार घडला त्यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या व्यक्तव्याचे त्यांनी समर्थन देखील केले आहे. मी माझ्या वक्तव्यावर पूर्णपणे ठाम आहे, कारण मी जे काही बोलतो ते शुद्धित बोलतो. कोणतीही हर्बल तंबाखू खाऊन बोलत नाही, त्यामुळे नवाब मलिक यांच्या सारखं बेशुद्धित विधान करायची माझी सवय नाही, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ता तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या राज्यात दंगली होत नाही, महाविकासआघाडी सरकारच्या राज्यात किंवा तथाकथित सेक्युलर, डाव्या विचारांच्या राज्यात दंगली होतात. कारण, या दंगलीला संरक्षण देण्याचं काम हे सरकार करतं, प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करतं. सरकारमधील मंत्री करतात, हा माझा स्पष्ट अनुभव आहे, असं खळबळजनक वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा अल्टीमेटम
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभय पाटील चिकटगावकर भाजपच्या वाटेवर; वैजापूरात बदलणार राजकीय समीकरणे!
- बापरे! अनन्याच्या कानात ओरडणारा हा व्यक्ती आहे तरी कोण?
- स्मृती दिनावरुन औरंगाबादेत आजी-माजी शिवसैनिकात वाद
- ‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीला लवकरच होणार अटक?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

