🕒 1 min read
औरंगाबाद : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपला रामराम ठोकणारे, तडकाफडकी मातोश्रीवर जात पुन्हा शिवबंधन हातात बांधणारे शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी हे सध्या शिवसेनेच्या कोणत्याच कार्यक्रमात अथवा मंत्र्याच्या दौऱ्यात दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेत गेलेले तनवाणी आहेत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित झालाय.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने तनवाणी यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे तनवाणी यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ते भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष होते. या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी युती केल्याने त्यांना तिकीट मिळाले नव्हते. या निवडणुकीदरम्यान त्यांनी युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा प्रचार केला होता.
निवडणूक संपताच काही दिवसांनी त्यांचा भाजप मधील शहर जिल्हाध्यक्षचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांना पुन्हा शहर जिल्हाध्यक्ष व्हायचे होते. परंतु शहर जिल्हाध्यक्ष पद संजय केनेकर यांना गेल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि स्वगृही परत जात हातात शिवबंधन बांधले. शिवबंधन बांधल्यानंतरही ते शिवसेनेच्या कार्यक्रमात अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या दौऱ्यात सक्रियपणे दिसून आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही ७० वर्षांत काय केलं, याचा हिशोब आणलाय का’
- ‘काहीही लिहू नका, तिला स्वर्गात शांतपणे राहू द्या’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- आंदोलनासाठी दीर्घकाळ सार्वजनिक जागेचा ताबा घेणे चुकीचे; सुप्रीम कोर्टाने आंदोलकांना सुनावले खडेबोल
- ‘शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का’?
- फेसबुक करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण स्मार्टवॉच बाजारात आणण्याची तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
