Share

‘जहाँ हमारे नाम से आग लग जाती है!’, राऊतांचा शायरीतून वार

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात भेट झाल्याची चर्चा काल राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली. मात्र याबाबत आता संजय राऊत यांनी स्वत: खुलासा केला आहे. आमच्यात कोणतीही भेट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो होतो. पण ते उघडपणे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं संजय राऊत आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. तसंच आमच्या भेटीच्या निव्वळ अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मागे एकदा मी शेलारांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही उघडपणे कॉफी प्यायलो होतो, असं सांगतानाच जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ. मजबूतीने एकत्र येऊन. माझ्या लिखानाने कुणाला त्रास झाला असेल आणि त्यातून या अफवा आल्या असतील तर त्याचं मी स्वागत करतो’, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘अशा अफवा पसरवल्याने राजकारण हलत नाही, अस्थिरही होत नाही. महाराष्ट्र सरकारला अडचणीही होत नाही. पण अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, यानंतर राऊत यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला आहे. ‘मी ज्यांच्या डोळ्यात खुपतो किंवा ज्यांना माझा त्रास वाटतो, अशी लोकं जाणीवपूर्वक या अफवा पसरवत आहेत, अशा आशयाची शायरी त्यांनी ट्विट केली आहे. ‘हमारी अफवाह के धुएं वही से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है’, असे ट्वीट त्यांनी केले. सोबतच ‘जय महाराष्ट्र’ असेही लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!