दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, प्रकरण अंगाशी येताच ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. महाविकास आघाडीमधील सर्व महत्वाच्या नेत्यांच्या आता या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गंभीर प्रकरणावर मौन सोडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. तर, परमबीर सिंह यांच्या गंभीर आरोपानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात कमालीची अशांतता पसरली असून शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे.
‘परमबीर सिंग यांनी आरोप हे बदलीनंतर केले आहेत, पदावर असताना कुठलेही आरोप त्यांनी केले नाहीत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला देखील पाठवलं आहे. मात्र, यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते याचा उल्लेख यात नमूद करण्यात आलेला नाही.’ असं शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रांनी चौकशी केली तर फटक्यांची माळ लागेल, राज ठाकरेंचे गंभीर आरोप
- अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शरद पवारांचं भाष्य !
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा


