मुंबई : सामना नागरीला कायद्याला मुस्लीम लॉ बोर्डने विरोध केला आहे. त्यावर अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाद्वारे काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणले, ‘समान नागरी कायदा येतोय याची चाहूल लागल्यामुळे कट्टरवादी खवळले आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हा कायदा घटनाविरोधी आणि बिनकामाचा असल्याची बांग दिली आहे. काँग्रेस आणि त्यांची पिलावळ यात कधी सामील होते हे आता पाहायचे.’ असे ते म्हणले.
सामना नागरीला कायद्याला मुस्लीम लॉ बोर्डने विरोध केला आहे. ते म्हणाले की, हा कायदा घटना बाह्य असेल. दरम्यान, काँग्रेस कडून अध्यापही यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे. यावरुन अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केलीय.
समान नागरी कायदा येतोय याची चाहूल लागल्यामुळे कट्टरवादी खवळले आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने हा कायदा घटनाविरोधी आणि बिनकामाचा असल्याची बांग दिली आहे. काँग्रेस आणि त्यांची पिलावळ यात कधी सामील होते हे आता पाहायचे. pic.twitter.com/ae36cvLNoQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 27, 2021
काय आहे समान नागरी कायदा : यूनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ म्हणजे एक निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्माशी सबंध नाही. म्हणजेच, जर समान नागरी कायदा लागू झाला, तर सर्व धर्मांना एकसारखाच कायदा असेल. या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा एम. सिंह यांनी मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणतात, ‘भारत बदलत आहे. लोक जाती, धर्माच्या पलीकडे जात आहेत. त्यामुळे पारंपारिक बंधनं कमी होताना दिसत आहे. अशावेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नद्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवणं दूरगामी धोक्याचे ; सरकारने पुनर्विचार करावा’
- तिकिटासाठी मनसेत येऊ नका, राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांना फर्मान
- राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज-यलो ॲलर्ट
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनाला औरंगाबाद युवासेनेची साद; पूरग्रस्तांना केली मदत!
- पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा ; ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर


