Share

महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात; फडणवीसांचे ठाकरे सरकारवर ताशेरे

Published On: 

मुंबई : गोवा क्रुझ पार्टी आणि राज्यातील ड्रग्स छापेमारी प्रकरणावरुन नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण अधिकारी आणि साक्षीदारांना टार्गेट करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या प्रकरणातून फक्त प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते त्यावर हे नेते गप्प बसतात. गृहमंत्री फरार आहेत त्यावर हे गप्प आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची इतकी प्रकरणे सुरू आहेत, त्यावरून लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.

एनसीबी ड्रग्स प्रकरणात कारवाई करतं, याचा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? मग असं म्हणायचं का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करत आहात ? मुळात त्यांचं दुःख आहे की, सतत पडणाऱ्या छाप्यामुळे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!