🕒 1 min read
Sanjay Raut | नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
गुजरातच्या निवडणुका झाल्या आणि अचानक चीनने घुसखोरी कशी काय केली?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या प्रश्नावरून राऊत यांनी केंद्र सरकारच्या भूमीवर नाराजी व्यक्त करत कर्नाटकचा बंदोबस्त काढून केंद्राची सुरक्षा का उभी केली नाही?, असा सवाल उपस्थित केला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर मिश्किल टीका केली आहे. आमचे सरकार आल्यावर बचू कडू आमच्या सोबत येतील, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. राज्यात असे काही नेते आहेत सरकार जिथे तिथे जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
चीन विषयी कोणीही मोठा नेता बोलत नाही. पाकिस्तानचे नाव घेतात, मात्र चीनचे नाव घेत नाही, चीनला घाबरतात, अमित शहा म्हणतात जमीन जाऊ देणार नाही मात्र जमीन याआधीच गेली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “वारकरी संप्रदायाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलले नाहीत?”; संजय राऊतांचा खोचक सवाल
- Chandrakant Patil । चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तिघांना जामीन मंजूर
- Skin Care | सावधान! चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने होऊ शकतात ‘हे’ तोटे
- IND vs BAN 1st Test | ऋषभ पंतचे अर्धशतक हुकले, तर रचला ‘हा’ इतिहास
- Chhagan Bhujbal | “पुस्तकावर बंदी घालाल, पण लेखकाच्या लेखणीवर…”; ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वर भुजबळांनी राज्य सरकारला सुनावलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
