Share

वीर सावरकरांवर काँग्रेसने घृणास्पद आरोप केले तेव्हा उद्धव ठाकरे शांत राहिले आणि आता…

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद गेले काही दिवसात प्रचंड टोकाला गेलेला दिसून आला. यानंतर, महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.

आता वीर विनायक सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर टीका केली आहे. रणजीत सावरकर म्हणतात, ” काँग्रेसने वीर सावरकरांवर घृणास्पद आरोप केले. पण तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत राहिले. कोणतीही कारवाई, गुन्हा दाखल नाही झाला. तेच उद्धव ठाकरे, कंगनाच्या ‘तू’ बोलण्याने दुखावले. कंगनाच कार्यालय उध्वस्त केले. देश हे चित्र बघत आहे, समजत पण आहे.” अशी खोचक टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि कंगना रणौत वाद विकोपाला गेला असतानाच भाजप, रिपाइंने मात्र कंगनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या टीकाकरांवर निशाणा साधण्यात आला आहे. कंगनाला दुश्मन म्हणत तिचा जयजयकार करणाऱ्यांना सुनावले आहे. तसेच, बाळासाहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा निखारा अजूनही पेटत असून त्या निखाऱ्यार राख साचली आहे , असे कोणाला वाटत असल्यास एक फुंकर मारून पहावे! असे आव्हान देखील दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!