Share

‘मराठीत फलक लावल्याने काय होणार?’; अभिनेता सुमित राघवनचा प्रश्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे सर्व दुकानांवर आता मराठी भाषेत फलक लावायचा. या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरतून होत असले तरी या निर्णयाला विरोध देखील अनेक जणांनी दर्शवला आहे. गुणारत्न सदावर्ते यांनी देखील या निर्णयाविरोधात मुंबई हाय कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर आता अभिनेता सुमित राघवनने देखील या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे.

सुमित राघवनने (Sumit Raghavan) मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा महाराष्ट्रातील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ रिट्वीट करत आपल्या भावना केल्या. सुमित राघवनने ट्वीटद्वारे म्हणाला, याने काही मदत होणार का? तर अजिबात नाही. मराठी भाषेला प्रोत्साहन द्यायचे असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखं आहे, असं देखील यावेळी म्हणाला.

पुढे दुसऱ्या ट्वीटमध्ये सुमित राघवन म्हणतो, मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं? असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचे. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून “मराठी अस्मिता” जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय. असं सुमित राघवन याने आपलं मत व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!