🕒 1 min read
औरंगाबाद : ‘औरंगाबाद शहराचे हे नाव ब्राह्मण लोकांनी दिलेले आहे. औरंग म्हणजे अनेक रंग, जेब म्हणजे शोभनीय. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपले जीवन पुणे, रायगड येथे व्यतीत केले. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणे म्हणजे केवळ राजनीती आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी औरंगाबाद शहरासाठी काय योगदान दिले? कि ज्यासाठी शहराला त्यांचे नाव द्यावे. ज्या ५२ दरवाज्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव गाजले त्यांचे नाव बदलण्याचा अट्टहास का ?’ असे अनेक आरोप समाजवादी पक्षाचे फैसल खान यांनी गुरुवारी (दि.२८) आयोजित एका पत्रकार परिषदेत केले.
पुढे शहराच्या कारभाराविषयी बोलताना ते म्हणाले , ‘महानगरपालिकेतील अधिकारी पैसे खाण्यासाठीच बसलेले आहेत. आता आलेल्या नवीन आयुक्तांनी देखील रस्ते कामात आपले खिसे भरले आहेत. त्यामुळे त्यांनी विकासाच्या गोष्टी करू नये. मास्क सक्तीसाठी त्यांनी ज्या पथकाची नियुक्ती केली आहे. त्या पथकाचे अनेक गैरव्यवहार उघड झाले आहेत. मुंबई-पुणे येथे कार मध्ये जात असलेल्या कुटुंबाला मास्क सक्ती अनिवार्य नाही. त्याच्या उलट औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी हे मात्र कार मध्ये बसलेल्या फॅमिलीकडून दंड वसूली करतात.
काही ठिकाणी सेटलमेंन्ट केली जाते. महानगरपालिकेला बजेटमध्ये ५ टक्के अपंगासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. परंतु औरंगाबाद महानगरपालिकेकडून मागील ३ वर्षात या रकमेचा वापर अपंगाच्या विविध कार्यासाठी केलेला दिसून येत नाही. एमआयएम, शिवसेना, आणि भाजप या तिन्ही पक्षांनी नामांतर, धार्मिक मुद्दे हे विषय सोडून निवडणूक लढवून दाखवावी असे जाहीर आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- शेतकऱ्यांना चक्रव्युहात अडकवून आंदोलन दडपण्यापेक्षा अटक करावी – राकेश टिकैत
- कापसाच्या पैशासाठी शेतकऱ्याची थेट कृषी मंत्र्याकडे तक्रार
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- निवडणुकीत भाजपची बी टीम म्हणून कोण काम करत होतं हे राज्याच्या जनतेला माहित आहे : राष्ट्रवादी


