Share

एक ग्रामपंचायत गेली म्हणून काय झालं, चंद्रकांत पाटलांचं काम भक्कम; राणेंनी केली पाठराखण

Published On: 

सिंधुदुर्ग : राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडलं होतं. या निवडणुकांचं निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी अधिक सक्रिय सहभाग घेतल्याने या निवडणूका नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपचा दारुण पराभव केला आहे. खानापूरात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. दरम्यान, खानापूरचा निकाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली होती.

दरम्यान, भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे. ‘एक ग्रामपंचायत गेली म्हणून काही होत नाही, इतर ठिकाणी चंद्रकांत पाटलांचं काम भक्कम आहे, टीका करणारे करत राहतात. चंद्रकांत पाटलांचं काम चांगलं आहे.’ असं नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी सरकारचं स्टेअरिंग आपल्याच हातात असल्याचा दावा केला होता. यावरून नारायण राणे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘उद्धव ठाकरेंनी समजावून सांगावं राज्यातल्या तिजोरीत किती पैसे आहेत, राज्याची अर्थव्यवस्था काय आहे,’ असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हानच दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!