औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने आठवडी बाजार बंद केले होते. आता रुग्ण संख्या नियंत्रणात आल्याने पुन्हा एकदा आठवडी बाजार सुरू झाले आहेत. मात्र नागरिकांनी जास्त गर्दी न करता खरेदी करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांतर्फे तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात वर्तवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी आता संयम राखणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. आठवडी बाजार बंद करण्याबाबत स्थानिक पातळीवर महापालिकेने कारवाई केली होती. औरंगाबाद शहरात जाफरगेट भागात रविवारी, सोमवारी शहानुमियाँ दर्गा परिसरात, गुरुवारी छावणी भागात तर शुक्रवारी चिकलठाणा भागात बाजार भरवला जातो. फेब्रुवारी महिन्यापासून हे सर्व बाजार बंद होते. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने मागील आठवड्यापासून औरंगाबाद शहरात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे.
याविषयी पालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील शुक्रवारचा बाजार, सोमवारचा बाजार भरवण्यात देखील परवानगी आहे. सोमवारी (दि.१२) शहानुरमियाँ दर्गा परिसरात आठवडी पीरबाजार भरला होता. मात्र दुकानांची संख्या मर्यादितच होती. ग्राहक देखील कमी दिसून आले. शासन निर्देशानुसार शहरात आठवड्यातील शनिवार व रविवार असे दोन दिवस लॉकडाऊन ठेवलेला आहे. त्यामुळे जाफरगेट भागातील रविवारचा बाजार भरण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. गुरुवारच्या बाजाराबद्दल छावणी परिषद निर्णय घेईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का ?’
- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित – वनीथा श्रीनिवासन
- मोठी बातमी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पोहचले राहुल गांधींच्या भेटीला
- मला विश्वास आहे पंकजा मुंडे या पक्षापासून दूर जाणार नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे
- भुमरेंनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, शेत बळकावल्याचा महिलेचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

