लातूर: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या मारठवड्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा या अंतर्गत ते सध्या मराठवाड्यात आहेत. लातूर येथे झालेल्या आढावा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठाइत ते बोलत होते. मारठवड्याला लवकरात लवकर पानी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याच सोबत इतर मुद्यांवरही त्यांनी संवाद साधला.
मराठवाड्याला लवकरात लवकर पाणी उपलब्ध करणे हे शासनाचे धोरण आहे. पावसाचे पाणी गुजरात व समुद्रात वाहून जाते, हे पाणी वळण बंधाऱ्यांमार्फत माजलगाव धरणात आणून येथून उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्याला कसं देता येईल याबाबत जलसंपदा विभागास आराखडा सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच उजनी धरणाचे पाणी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात आणता येईल का याबाबत अमित देशमुख व जलनीती मधील तज्ञ यांच्या समवेत मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मागे लातूरला मिरज येथून ट्रेनने पाणी आणाले होते. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. शासन मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ओळख मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहील आणि मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुत तसेच मांजरा व निम्न तेरणा प्रकल्प अंतर्गत अंतिम टप्प्यात असलेल्या सर्व कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही यावेळी त्यांनी आश्वासन दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी सरनाईकांबद्दल निर्णय घेतलाय, लवकरच बातमी कळेल’, राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे दुरावा झाला कमी, नेत्यांच्या एकजुटीचा पक्षाला होणार फायदा ?
- पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू ; आता दुकाने राहणार केवळ ‘याच’ वेळेपर्यंतच सुरु
- अनुष्का शर्माच्या नव्या लुकने अनेकांचे वेधले लक्ष; पहा फोटो
- औरंगाबाद मनपाचा दणका! ‘याठिकाणी’ नालेसफाईवर झालेला खर्च व्यावसायिकांकडून वसूल करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

