Share

‘खुलेआम भ्रष्टाचार करू पण कोणी बोलायच नाही, लिहायच नाही,अन्यथा थेट कारवाई’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी कोल्हापूरला येत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या कराडमधून परतले आणि कोल्हापुरात होणारा संभाव्य संघर्ष तात्पुरता टळला असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा दिलेला इशारा आणि स्वागताला भाजपने केलेली तयारी यामुळे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची चिन्हे होती.

यामुळेच रेल्वे स्थानकासह ठिकठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या माघारी फिरले आणि पोलिसांनी नि:श्वास टाकला. पण या निमित्ताने संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या एका हाय होल्टेज ड्रामावर तात्पुरता पडदा पडला. दरम्यान झालेल्या या सर्व प्रकरणावर आता भाजपने ठाकरे सरकारला चांगलेच घेरले असल्याचे पहायला मिळत आहे.

भाजपचे नेते व प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ‘हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे भ्रष्टाचारी सरकार आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या पण कारवाई केली नाही, १०० कोटीच्या खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री गायब आहेत खुलेआम भ्रष्टाचार करू पण कोणी बोलायच नाही, लिहायच नाही, पहायच नाही अन्यथा थेट कारवाई करणार. ही तालीबानी वृत्ती जनता ऐकून घेणार नाही.’ असे ट्वीट करत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!