Share

‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’, खा. इम्तियाज जलील यांची ग्वाही

Published On: 

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांना दिले. ते गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गंगापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंचनामे वेगाने करण्याच्या सूचना देऊ, असे ते म्हणाले.

खासदार इम्तियाज यांनी ढोरेगाव, सोलेगावसह गंगापूर तालुक्याचा दौरा केला. मालुंजा येथील शिवना नदीवरील पुलाची पाहणी करून भालगाव मेंढी, झोडेगाव, वाडगाव, मांजरी येथील अतिवृष्टीने व शिवना नदीला आलेल्या पुरामुळे शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

प्रथम त्यांनी ढोरेगाव शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून दौऱ्यास सुरवात केली. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अयुब पटेल यांनी ढोरेगाव ते कदीम शहापूर जाणाऱ्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था दाखवली. मालुंजा येथील शिवना नदीवरील धोकादायक फुलाची पाहणी केल्यानंतर खासदार जलील यांनी मेंढी येथे पडझड झालेल्या जिल्हा परिषद शाळा खोलीची पाहणी करून खरडून गेलेल्या शेतीची, पिकाची पाहणी केली. यानंतर भालगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन एका सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!