🕒 1 min read
पुणे : विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या संशोधन प्रकल्पांना आणि त्यातून तयार केलेल्या उपकरणांना प्रसिद्धी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातील नूतन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि विद्वान व्यक्तींचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासोबत आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न महाविद्यालयांनी करावा. प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी व्हावा हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे.
देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही. त्यामुळे देशातील आदर्श शिक्षण प्रणाली तीन टप्प्यात आणली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यमान पायाभूत सुविधांचा आधारे विद्यार्थ्याला पुढे नेण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक संस्थामधील सुविधा अधिक उन्नत करणे आणि तिसऱ्या टप्प्यात शासन आणि संस्था मिळून नवे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या दिशेने वाटचाल करताना स्वायत्त संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवाळीनंतर संस्थांच्या प्रतिनिधींची कुलगुरूं सोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उच्च शिक्षणासोबत राज्याचा इतिहास व संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना होणे गरजेचे असून विद्यापीठांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आणि अनुभवाचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड दूर करण्याचा महाविद्यालयांनी आणि पालकांनी प्रयत्न करावा, त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेईल,असेही सामंत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- तिसरी घंटा वाजली आणि गहिवरून आलं – अशोक हांडे
- ‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’; समीर वानखेडेंनी अनन्याला खडसावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

