🕒 1 min read
इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला. पराभवानंतर कोहलीने याचे कारणही सांगितले.
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाची लय बिघडली होती. ‘पहिला दिवस पावसाने वाहून गेला आणि जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा लय शोधणे कठीण होते. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या, जर पाऊसाचा खेळात व्यत्यय आला नसता तर आम्ही आणखी धावा करू शकलो असतो.’
This isn’t just a team. It’s a family. We move ahead. TOGETHER ???????????? pic.twitter.com/E5ATtCGWLo
— Virat Kohli (@imVkohli) June 24, 2021
दरम्यान, कर्णधार कोहलीने टीम इंडियासाठी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून कर्णधार कोहली आपल्या टीमचं मनोबल वाढवताना दिसत आहे. कोहलीने ट्विट करत लिहिले की, ‘भारतीय टीम फक्त टीम नाही तर एक परिवार आहे. आणि आम्ही एकत्र पुढे जाऊ’ अशा आशयाचे ट्विट यावेळी कोहलीने केले आहे. एक कर्णधार म्हणून आपली जबाबदारी जाणत कोहली या ट्विटच्या माध्यमातून भारतीय संघाला प्रोत्साहीत करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शासकीय कॉलेजच्या फी मध्ये ‘इतक्या’ हजारांची सूट !
- मानलं ‘टाटा’ ! जमशेदजी टाटा जगातील सर्वात दानशूर व्यक्ती
- ओबीसी समाजाला फसवणाऱ्या वडेट्टीवारांची हकालपट्टी करा; चित्रा वाघ यांची मागणी
- ‘पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प?’
- भारतीय स्वातंत्र्याच्या १८५७ च्या उठावात ‘औरंगाबाद’चे मोलाचे योगदान : डॉ. रमजान शेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
