Share

कोणतेही कागद न मागता आम्ही मदत केली, अजून तरी या सरकारने कोणती मदत केली नाही- फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोकण आणि कोल्हापूर भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरातील मिठापासून पीठापर्यंत सर्वच वस्तू खराब झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. या आधी २०१९ मध्ये आलेल्या पूरात नागरिकांची सर्व कागदपत्रे वाहून गेली होती. त्यामुळे साधे राशनकार्डही न मागता आम्ही मदत केली होती. तशीच मदत या सरकारने करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.

राधानगरी किंवा अलमट्टी विसर्गाचा प्रश्न नसताना आणि पाऊस फार नसताना सुद्धा ही आपत्ती आली, त्यामुळे या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दुष्काळी भागात पाणी वळविणे हा उपाय आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये जागतिक बँकेने यासाठी अर्थसहाय्य मंजूर केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1421027366969638916

नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आता मदतीची नागरिकांना जास्त गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकारात लवकर घोषणा करावी आणि नागरिकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!