मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्याच सोबत ठाकरे सरकारला जागं करण्यासाठी आपल्याला हा लढा आणखी तीव्र करावा लागेल, असं देखील ते यावेळी म्हणाले. रामदास आठवले यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हेदेखील उपस्थित होते.
एसटीचे विलीनीकरण आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ठाकरे सरकारला जाग आणावी लागणार आहे. त्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल असे आठवले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, एसटी नसती तर मी पुढारी झालो नसतो, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी देखील कर्मचाऱ्यांसामोर मांडल्या.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संपाचा तिढा सोडविण्यासाठी काही उपाय किंवा सर्वसामायिक व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यावर तोडगा काढता येऊ शकतो का, अशी विचारणा न्यायालयानं राज्य सरकार आणि एस टी संघटनांना केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- खासदारातला डॉक्टर; अस्वस्थ विमान प्रवाशावर उपचार करत खा. कराडांनी घडवले माणुसकीचे दर्शन!
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…
- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे कामगारांनीच सांगावं- अनिल परब
- …त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले- झिशान सिद्दिकी


