🕒 1 min read
गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आसामच्या विविध क्षेत्रात आणि अरुणचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरासारख्या इतर पूर्वोत्तमर राज्यांमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोहन भागवत यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनेशी संबंधित तसेच कोरोना महामारी संदर्भात समाज कल्याण कामांचा आढावा व उपायांवर चर्चा करण्यात आल्याचं भागवत यांनी सांगितले.
गुवाहाटीत आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, सामाजिकता आणि लोकशाही शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरेत आणि रक्तात ते आधीपासूनच आहे. आमच्या देशाने त्याची अंमलबजावणी केली आहे आणि अजुनही देशात हे अस्तित्वात आहे.
We don't need to learn secularism, socialism, democracy from the world. This is in our traditions, in our blood. Our country has implemented these and kept them alive: RSS Chief Mohan Bhagwat, in Guwahati, Assam pic.twitter.com/byWzP4IRod
— ANI (@ANI) July 21, 2021
देशात सीएए कायद्यामुळे कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला त्रास होणार नाही. सीएए आणि एनआरसी यांचा हिंदू-मुस्लीम विभाजनाशी कोणताही संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी काही लोकांकडून याला धार्मिक रुप दिलं जात आहे, असेही भागवत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट
- बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्यालाच; खंडपीठाचा हस्तक्षेपास नकार
- ‘आठ दिवसांत कोरोना काळातील बिले द्या, अन्यथा..’ आ. धस यांचा इशारा
- मी माझी स्थिती एकनाथ खडसेंसारखी होऊ देणार नाही-पंकजा मुंडे
- ‘१२ आमदारांच्या नियुक्त्या का केल्या नाहीत?’, हायकोर्टाच्या प्रश्नांमुळे राज्यपालांची कोंडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
