उस्मानाबाद : आम्ही सुरुवातीपासून धाराशिवच म्हणतो. हे धाराशिवच असून, नंतर त्याचे उस्मानाबाद नामांतर झाले, असे सांगत शासकीय पातळीवर उस्मानाबादच्या धाराशिव नामांतरणासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेवर राज्याचे नगरविकासमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करणे टाळले. ते उस्मानाबाद येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत हाेते.
पत्रकारांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, नवाब मलिक यांचे जावई आदींच्या प्रकरणावरून विचारले असता, मी येथे प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आलो असून, राजकीय भाष्य करणार नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय टाळला. महाविकास आघाडी मजबूत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वकाही सुरळीत चालले आहे. राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्य शासनाने निर्णय घेतलेल्या युनिफाइड डीसीपीआर योजनेंतर्गत आता राज्यात एकाच नियमावलीअंतर्गत नगरविकासाची कामे होतील, असे स्पष्ट केले. यामुळे शहरनिहाय बदलणाऱ्या नियमांना तसेच एसएफआयमधील गैरप्रकारांना आळा बसेल. या नवीन नियमांमुळे १५०० स्केअर फुटांपर्यंतच्या बांधकामाला परवानगीची आवश्यकता नसेल असेही स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही थंडीने मरत आहोत मात्र सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ देत आहे”
- देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – वर्षा गायकवाड
- राज्यातच नाही तर देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणी आग्रही असू नये; राऊतांचा काँग्रेसला टोला
- औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रलंबित प्रश्न सहा महिन्यात सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आदित्य ठाकरे
- अर्थसंकल्पापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा केंद्र सरकारला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

