Share

उस्मानाबादेत पाणी ओसरले, संकट ‘जैसे थे’; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. गेले दोन दिवस पाऊस न पडल्याने पूर ओसरत आहे. सोबतच शेतातील पाणी ओसरत आहे. पूर ओसरल्यानंतर आता नेमकं किती नुकसान झालं आहे हे चित्र वरचेवर स्पष्ट होत आहे. शेतीचे नेमके किती नुकसान झाले? किती जमीन खरडून गेली? याचे पंचनामे आता सुरू झाले आहेत. दोन दिवस पाऊस पडला नसला तरी काही शेतात आज घडीला पिकात पाणी दिसत आहे. आता ही पिके कुठल्याच कामाची नसून हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे वाहून गेला, त्यामुळे आता कसं जगावं? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. दोन लाख हेक्टरवरील खरिपाची पिकं पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतामध्ये सध्या पूर्ण चिखल आहे. त्यामुळे शेतातल उभं पीक जागेवरच कुजू लागलं आहे. सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना एक रुपयाचीही दमडी हाती येणार नाही. या उलट शेतातील उभं पीक काढायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

पाहणी, पंचनामे, आश्वासन नको थेट मदत करा, अशी मागणी शेतकरी सरकारकडे करीत आहेत. तसेच शासनाने पंचनामे न करता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी ही सध्या जोर धरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!