Share

कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे प्लांटस बंद ; पुण्यातून पाठवले १७ टँकर पिण्याचे पाणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात जनजीवन ठप्प झाले आहे. कोल्हापुरातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे काही प्लांटस बंद पडले आहेत. पंपिंग स्टेशन मध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देवू केला आहे. पुण्यातून पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे १७ टँकर कोल्हापूरात पोहेचले आहे. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने कोल्हापूर महापालिकेची पंपिंग यंत्रणा तसेच जलशुद्धीकरणाचे प्लांट्स बंद आहेत. यामुळे आपत्ती च्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा चालू ठेवण्यात आलेली आहे.

टँकर्स बरोबर supervisor, electrician, इ असे एकूण २१ जण आज सकाळी कोल्हापूर ला सुखरूप पोहोचले. साधारण एक आठवड्याच्या कालावधीची तयारी करण्यात आली आहे. या कालावधी मध्ये सगळ्यांच्या निवासाची तसेच खाण्याची सम्पूर्ण सोय कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!