अहमदाबाद – गुजरातमध्ये आजपासून पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं 9 वी ते 11 वी चे वर्ग सुरु होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी मागील आठवड्यात हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नसेल तसच ऑनलाईन शिक्षणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे.
जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार असतील त्यांच्या पालकांच्या सहीच संमती पत्र शाळेला देणं आवश्यक असणार आहे. तसच विद्यार्थी तसच शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सुरक्षित अंतराचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशात सोळा महिन्यानंतर इयत्ता अकरावी आणि बारावीचे वर्ग आजपासून पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-19 संबंधी मार्गदर्शक सूचनांचं सक्तीनं पालन करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे आदेश राज्य सरकारनं शाळांच्या व्यवस्थापनांना दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यावरील पुराचे संकट आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘सर्व ओटीटी वरील फिल्म्स आणि वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमाखाली आणण्याबाबत विचार व्हावा’
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी – पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

