🕒 1 min read
मुंबई: आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्वाधिक प्रभावित केल्यानंतर, स्टार फलंदाज रोहित शर्मा टीम इंडियासोबत अगदी तेच करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कसोटीत श्रीलंकेला २-०ने क्लीन स्वीप केले. यापूर्वी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये न्यूझीलँड आणि वेस्ट इंडिजविरुद्धही असाच पराक्रम हिटमॅनच्या आर्मीने करून दाखवला होता. यामुळे रोहितचे सगळीकडून कौतुक होत आहे.
माजी खेळाडू वासिम जाफरने (wasim jaffer) मुंबईकर रोहित शर्माचे (rohit sharma) कौतुक करत बरोबर नेतृत्व बरोबर कर्णधारकडे गेले असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला,” रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा चांगला कसोटी कर्णधार होऊ शकतो. तो किती कसोटी सामन्यात कर्णधार असेल हे माहीत नाही, पण कुशल कर्णधारांपैकी तो एक सर्वोत्तम कर्णधार आहे असे मला वाटते. त्याने प्रत्येक मालिकेत कसे व्हाईटवॉश केले याचे परिणाम आपण पाहत आहोत. योग्य कर्णधाराच्या हाती कर्णधारपद आल्यासारखे वाटत आहे”
रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने विक्रम रचले आहे. भारताने त्यांच्या १५ सामन्यात घरच्या मैदानावर एकही गमावला नाही त्यामुळे विजयाची टक्केवारी ९३.७ नोंदवली गेली. आशियाई संघांमध्ये नोंदवलेली ही सर्वाधिक विजयाची टक्केवारी आहे. २००८- ०९ च्या मोसमातील भारतीय संघाने पुढील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. ज्यात घरच्या मैदानावर ११ पैकी आठ सामने जिंकले तर तीन अनिर्णित राहिले त्यामुळे विजयाची टक्केवारी ७२.७ नोंदवली गेली होती.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: अजित आगरकरचा ‘या’ आयपीएल फ्रँचाइसीबाबत खुलासा; म्हणाला “सगळे त्यांच्यावर हसत…”
- ‘तेव्हा आम्ही बघूच की कोण आयपीएल खेळायला जातो’ ; पीएसएलमध्ये मोठा बदल आणण्याचे रमीज राजांचे संकेत
- IPL 2022: सुरेश रैना आयपीएलमध्ये परतणार; यंदा मात्र एका नवीन रूपात!
- जळगावात विद्यार्थिनीने दिला रोड रोमिओला चोप; व्हिडिओ व्हायरल
- कवी कुमार विश्वासची ‘काश्मीर फाइल्स’वर जळजळीत प्रतिक्रिया

