🕒 1 min read
Asia Cup 2022 | नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय दिग्गज विराट कोहली याने आपले ७१ वे शतक झळकावल्यामुळे करोडो भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. शतकानंतर विराटने आपल्या या शानदार खेळीचे श्रेय पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिले. दरम्यान, शतकानंतर विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारला काहीतरी सांगितले जे खूप व्हायरल होत आहे.
मैदानावर 122 धावांची नाबाद इनिंग खेळून विराट ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना सर्व खेळाडू त्याच्याशी हस्तांदोलन करत असताना विराट भुवनेश्वर कुमारला म्हणाला, “अभी है क्रिकेट बाकी”. हे उत्तर ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने 4 षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने 19व्या षटकात 19 धावा दिल्या. यानंतर चाहते त्याच्यावर नाराज झाले होते आणि पराभवासाठी त्याला ट्रोल करत होते पण भुवनेश्वर कुमारने आता लय साधली आहे.
https://twitter.com/RoroBoro98/status/1567900196444708867
कोहलीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. कोहलीला तब्बल ३ वर्षे आणि ८३ डावांनंतर शतक झळकावण्यात यश आले. यापूर्वी कोहलीला संघाबाहेरील काढण्याची देखील चर्चा सुरू होती. आता कोहलीने आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, टीम इंडियाचा आशिया कपमधील प्रवास आता संपला आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना आता ११ सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | अजित पवारांनी पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन
- Chandrakant Patil | ‘बारामतीत सुप्रिया सुळेच निवडून येणार’ म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- Ajit Pawar । पक्षाने तुम्हाला, तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर द्या?; अजित पवारांचा बावनकुळेंना खोचक सवाल
- Yakub Memon | दहशतवादी याकूब मेमन पुन्हा जिवंत? शिवसेना-भाजप संघर्षात भर
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
