विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind Vs Sa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. दरम्यान, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, कर्णधार विराट कोहली या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.

केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, “विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.”

विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता तर मालिकेतील शेवटचा सामना हा १००वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा 99 वा सामना असेल.

महत्वाच्या बातम्या: