नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind Vs Sa) यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. दरम्यान, भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, कर्णधार विराट कोहली या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.
केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, “विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.”
विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता तर मालिकेतील शेवटचा सामना हा १००वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा 99 वा सामना असेल.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र