🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : उद्या भारताचा ७३ वा स्वतंत्रदिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच दिल्लीतील एका कार्यक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीर चक्र या सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. पाकिस्तानविरोधात निकराचा लढा देत दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या f-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानच्या बालाकोट मधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
Indian Air Force's (IAF) Wing Commander Abhinandan Varthaman to be conferred with Vir Chakra on Independence Day. (File pic) pic.twitter.com/an2fCoVNLb
— ANI (@ANI) August 14, 2019
तसेच, या प्रसंगात ते पाकिस्तानात गेले होते त्यामुळे त्यांना कैद करण्यात आले होते. त्यानंतर भारताने टाकलेल्या दबावामुळे अवघ्या ६० तासांत अभिनंदन यांची पाकिस्तानला सुटका करावी लागली. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन भारतभूमीवर परतले होते. त्यानंतर त्यांची मेडिकल चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांना मानसिक किंवा शाररीक त्रास देण्यात आला तर नाही ना याचीही चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, ‘परम वीर चक्र’, ‘महा वीर चक्र’ यानंतर ‘वीर चक्र’ हे तिसऱ्या क्रमांकाचं शौर्य पदक आहे. हे पदक युद्धावेळी वीरता दाखवणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांना प्रदान केलं जातं. असामान्य साहस किंवा बलिदान देणाऱ्या जवानांना हे मानचिन्ह देण्याची परंपरा आहे. त्यामुळे अभिनंदन यांच्या शौर्याची दाखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- १५ ऑगस्टला अमित शहा फडकवणार काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा !
- सांगली : एटीएम, इंटरनेट सेवा, सर्व्हर बंद झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प
- पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेणे म्हणजे राजकारण करणे नव्हे : शरद पवार
- सरकारला उशिरा सुचले शहाणपण; आता पूरग्रस्तांना रोख रक्कमेत दिली जाणार मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

