🕒 1 min read
नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल(१९ नोव्हें.) सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांनी हा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
सोनिया म्हणाल्या की, ‘७०० हून अधिक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात बलिदान दिले आहे. आज त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे. लोकशाहीत कोणताही निर्णय प्रत्येक संबंधितांशी सल्लामसलत करून आणि विरोधकांशी सल्लामसलत करून घ्यावा. मला आशा आहे की मोदी सरकारने भविष्यासाठी काहीतरी धडा शिकला असेल.’ तसेच गांधीवादी आंदोलनाच्या तब्बल १२ महिन्यांनंतर आज देशातील ६२ कोटी अन्नदाते-शेतकरी-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.
आज सत्य, न्याय और अहिंसा की जीत हुई।
पिछले 7 सालों से भाजपा ने लगातार खेती पर हमला बोला है।
उम्मीद है कि प्रधानमंत्री MSP सुनिश्चित करेंगे व भविष्य में राज्य सरकारों, किसान संगठनों और विपक्षी दलों की सहमति बनाएंगे– कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी#जीता_किसान_हारा_अभिमान pic.twitter.com/GiScsHi0Jl
— Congress (@INCIndia) November 19, 2021
दरम्यान, पुढे केंद्र सरकारवर निशाणा साधत सोनिया म्हणाल्या की, ‘आज सत्तेत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविरोधात रचलेलं षडयंत्रही पराभूत झालं आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकार देखील. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.’
महत्वाच्या बातम्या:
- एसटी प्रशासनाचा संप मोडण्यासाठी विविध क्लुप्त्या; कर्मचारी मागण्यांवर ठाम!
- ‘एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण याला ‘हा’ एकच पर्याय उपलब्ध’
- ‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’
- पेन्शन पासून वंचित पात्र स्वातंत्र्य सैनिकांना न्याय द्या; सामाजिक संघटनांचे ठाकरे सरकारला साकडे!
- कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
