Share

‘बंगाल जळत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते गप्प का?’

Published On: 

🕒 1 min read

पनवेल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भाजपा तसंच इतर पक्षांनी हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.

सध्या तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडून बंगालमध्ये अमानुष हिंसाचार सुरू आहे,बंगाल जळत आहे आणि विजयाचा उन्माद डोक्यात गेल्याने ममता बॅनर्जी हे मुकसंमत्तीने बघत आहेत या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टीचा जाहीर निषेध भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पनवेल येथे केला.

ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये भाजप कार्यत्यांवर तसेच कार्यालयावर भ्याड हल्याची मालिका चालवली आहे. दिवसाढवळ्या मुडदे पाडले जात आहेत आणि ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. याचा निषेध करत निवडणुकीचा विजय ममता बॅनर्जींच्या डोक्यात गेला असल्याची खंत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली.

प. बंगालच्या विजयावर जणू काही स्वतःच्याच घरी पाळणा हलला अश्या आनंदात शुभेच्छांचा वर्षाव करणारे स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील संधीसाधू नेते यावर प्रतिक्रिया का देत नाहीत? निषेध का करत नाहीत? की यांचा या हिंसाचाराला मुकपाठिंबा आहे? असा सवालही विक्रांत पाटील यांनी विचारला. यावेळी त्यांच्यासह भाजपा नेते तथा कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस समीर कदम यांची ही प्रमुख उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!