🕒 1 min read
जालना : ओबीसी समाजाचे न्याय्यहक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे ओबीसी, मदत, पुनर्वसन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये. ही आमची भूमिका आहे. ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्याय्यहक्क मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघात भाजपची विजयाची परंपरा ओबीसी समाज एकजूट झाल्याने आणि तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे मोडीत निघाली आहे.
या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामुळे भाजपच्या विचारांविरुद्ध देशामध्ये मोठा संदेश गेला आहे. यावेळी आमदार राजेश राठोड, बबनराव तायवडे, बाळासाहेब सानप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद, प्रदेश सचिव प्रा.सत्संग मुंढे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राम सावंत आदींची उपस्थित होती.
महत्वाच्या बातम्या
- 1 जानेवारी पासून UPI पेमेंटवर शुल्क आकारणी
- ‘कुमारस्वामींचे वर्तमान हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भविष्य
- काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला, कुमारस्वामींनी मांडली व्यथा
- चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के, त्यांनी खरंच हिमालयात जावं- अब्दुल सत्तार
- ‘सध्या भारतीय संघाला नेतृत्वबदलाची गरज नाही’ विराट-रोहित चर्चेवर लक्ष्मणची प्रतिक्रिया


